Sunday, 26 November 2017

विचारांचे वलय

भाग - 5
प्रधानाने दुकानदाराला हि माहिती दिली. त्याने मुद्रा घेऊन चंदन लाकडे राजवाड्यात पाठवून दिली.

या कथेवरुन असे दिसते की, दुकानदार व राजा एकमेकांना ओळखत नव्हते. दुकानदार राजाच्या मृत्यूची वाट पहात होता, म्हणजेच वाईट विचार करत होता.

विचारांच्या लहरी राजापर्यंत पोहोचल्या व राजाच्या मनातसुध्दा दुकानदाराबद्दल वाईट विचार आले.

नंतर प्रधानाने दुकानदाराचे राजाबद्दलचे मत बदलले, त्यामुळे राजानेसुध्दा दुकानदाराबद्दल चांगला विचार केला.

म्हणजेच आपण एखाद्याबद्दल जसा विचार करतो, तो व्यक्ती तसाच विचार करणार !
(समाप्त)

Saturday, 25 November 2017

विचारांचे वलय

भाग - 4
प्रधान मुद्दाम खोटे बोलला कि, राजाने काही मुद्रा दिल्या आहेत. त्या बदल्यात तुम्ही चंदन लाकडे द्या.

दुकानदाराने मुद्रा घेतल्या व लाकडे दिली. प्रधान ती लाकडे घेऊन राजाकडे गेला व म्हणाला,
चंदनविक्री करणाऱ्या दुकानदाराने आपणांस लाकडे भेट दिली आहेत. तो आपली खूप स्तुती करत होता.

राजा खुश झाला. त्याने शिल्पे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चंदन मागविण्यास सांगितले.
(क्रमश:)

Thursday, 23 November 2017

विचारांचे वलय

भाग - 3
प्रधान दयाळू होता. त्याने विषय बदलून राजाला तेथून पुढे नेले व दुकानदाराचा जीव वाचवला.

नंतर प्रधान गुपचूप त्या चंदनविक्री करणाऱ्या दुकानदाराकडे गेला. त्याची चौकशी केली.

दुकानदार म्हणाला, या गावात माझे एकच चंदनविक्री दुकान आहे. तरीसुध्दा विशेष कमाई होत नाही. लोक येतात, थांबतात, सुगंध घेतात आणि निघून जातात.

हा राजा केव्हा मरण पावेल याची मी वाट पहात आहे.
(क्रमश:)

Wednesday, 22 November 2017

विचारांचे वलय

भाग - 2
प्रधानाने विचारले, राजन का थांबलात ?
तेव्हा राजाने म्हटले, या चंदनविक्री करणाऱ्या दुकानदाराला हत्तीच्या पायाकडे टाकावे असे मला  वाटते.
प्रधानाने विचारले, तुम्ही त्याला ओळखतही नाही. तुम्ही त्याला का मारण्याचा विचार करत आहात ?
राजा म्हणाला, दुकानदाराला पाहून माझ्या मनात आपोआप तसा विचार आला.
(क्रमश:)

Tuesday, 21 November 2017

विचारांचे वलय

भाग - 1
आपल्या विचारांच्या लहरी सर्वत्र फिरत असतात. आपण जसा विचार करतो, तसे सहकारी मित्र भेटतात व टिकतात.

एक राजा आपल्या हत्तीवरुन गावातून जात होता. त्याच्यासोबत प्रधान मागे बसला होता.

गावातून जात असताना राजाला वाटेत चंदन लाकूड विक्रीचे दुकान दिसले. त्याने माहूताला दुकानासमोर थांबण्यास सांगितले.
(क्रमश:)

Friday, 10 November 2017

नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या घालण्याची प्रथा कशी आली ?

(भाग - 2)
2003 साली महाराष्ट्र टाईम्सचे त्यावेळी असलेले संपादक भारतकुमार राऊत म्हणतात,
नऊ रंग हि आमची आयडीया होती. यात धार्मिकता वगैरे काही नाही.

लोकसत्ता पेपरचा खप जास्त होता. महाराष्ट्र टाईम्सचा खप घसरत होता. खप वाढवण्यासाठी महाराष्ट्र टाईम्सने केलेली ही मार्केटिंग होती.
(क्रमश:)

नवरात्रीत 9 रंग कसे आले ?

(भाग - 3)
2003 साली महाराष्ट्र टाईम्सने 9 रंगाच्या साड्या घातलेल्या मॉडेल्सचे फोटो छापून आणले.  आपले फोटो पाठवा, असे महिलांना आवाहन केले.
मग काय !
टाईम्सच्या कार्यालयात कॉलेज, बँका, कार्यालये येथून महिलांच्या फोटोंचा पाऊस पडला.
त्यावेळी वाचकांना बातमी शोधावी लागे, इतके फोटो छापले जात.

9 रंग वापरण्याची अंधश्रध्दा वाढू लागली म्हणून शेवटी संपादक भारतकुमार राऊत यांना आपली मार्केटींग जाहीर करावी लागली.
(समाप्त)

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?

भाग - 2 अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघ...